HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त दुकानदारांना दिला दिलासा, म्हणाले…

चिपळूण। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(२५ जुलै) चिपळूणला पुरग्रस्थांची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. तिथल्या बाजारपेठेचा आढावा घेत असताना त्यांनी अनेक दुकानकारांशी संवाद साधला. तिथल्या व्यापाऱ्यांनीही आपल्या व्यथा आणि झालेल्या नुकसानची माहिती दिली. उद्धव ठारेंसोबत परिवहन मंत्री अनिल पवार आणि शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना लगेल ती मदत करू, जरा वेळ जाईल पण पुन्हा पायावर उभा राहू असं आश्वासन दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे आज(२५ जुलै) चिपळूणला पाहणी करत आहेत. या वेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘आपल्याला आधी जीव महत्वाचा, कोनतीही जीवित हानी नको आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलं होतं, पुढे अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून आपण एक जलव्यवस्थापना करू जेणेकरून पाणी साचणार नाही आणि नुकसान होणार नाही. या व्यवस्थापनेला जरा वेळ लागेल पण नक्कीच अमलात आणलं जाईल,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुन्हा तळीये गावात जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल(२४ जुलै) महाडच्या तळीये गावात पाहणी करत होते. अतिवृष्टीमुळे शुक्रवारी तळीये गावात पहाटे ४ च्या दरम्यान दरड कोसळून अनेक लोकांचा जीव गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी या गावातल्या लोकांना आणि मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. उद्या (२६ जुलै) पुन्हा ते या गावात जाऊन तिथे पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही

राज्य सरकारने चांगलं किंवा वाईट काम केल्याचं प्रशस्तीपत्रं देण्यासाठी आलेलो नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. प्रशस्तीपत्रं देण्याची ही वेळ नाही. मृतदेह बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे. प्रशासन चांगलं काम करत असेल तर त्यांच्या पाठी राहीलं पाहिजे. आज फोकस रिलीफवर असला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना घडल्या तर काय केलं पाहिजे याचं आकलन करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले आहेत.

सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल

चिलबलूंमधल्या पूर परिस्थितीत अनेक लोकांचे जीव गेले आहेत आणि घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत ८७ लोक गेल्याचं कळतं. ४४ मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याने मदत दिली आहे. या मदतीच्या पलिकडे मदत होणार नाही असं नाही. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर आजवर केलेली मेहनत फटाक्यांमुळे वाया घालवू नका, मुख्यमंत्र्यांचे दिवाळीनिमित्त आवाहन

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे युद्धात जिंकले व तहात हारले अशीच अवस्था!

News Desk

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण | अजित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ

News Desk