HW News Marathi
देश / विदेश

शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला !

पालघर | “नवीन सरकारने बजेटमध्ये एक नवीन पैसा शेतकऱ्यांना दिला नाही. २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला,” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली होती. पालघरमध्ये आज भाजप मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, “हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आणि अशीच बेईमानीचे हे सरकार पहिल्यादिवसापासून करत आहे. २५ हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे,” अशी मागणी महाविकासआघाडीच्या सरकराने केली होती. नवीन सरकारने बजेटमध्ये एक नवीन पैसा शेतकऱ्यांना दिला नाही. २५ हजार रुपये देतो म्हणून सांगितले आणि हाती भोपळा दिला. एक नवा पैसा दिला नाही, शेतकऱ्यांची बेईमानी करण्यापासून त्यांच्या सरकारला सुरुवात झाली,” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान, “वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसविले, आणि ४० टक्के गुण मिळालेले सत्तेत आले. अशा प्रकारचे सरकार फार काळ चालणार नाही, असा टोलाही फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर केली. यानंतर महाविकासआघाडीचे सरकार काय म्हणाले, आम्हाला द्याचे आहे. आम्ही मोदी सरकारकडे मदत मागतोय, मग सरकार बनविताना मोदीसाहेबांची आठवण नाही झाली. शब्द देताना मोदीसाहेबांची आठवण नाही आली. आता काय मोदीसाहेबांच्या जिवावर तुम्ही शब्द दिला होता का, असा सवा फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असे वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

तुमच्या मनगटात जोर पाहिजे ना | फडणवीस

“जी मदत करायची आहे ती मोदीसाहेब करतील पण तुमच्या मनगटात जोर पाहिजे ना, सरकार बनविता तीन तीन पक्ष एकत्रित येतात आणि या ठिकाणी सांगत आम्ही मदत करू, एक नव्या पैशाची मदत याठिकाणी ठाकरे सरकारने केली नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणे असे वचन दिले असे म्हणता पण मला सांगात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असे वचन शिवसेना प्रमुखांना दिले होते का?,” सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, पण आता…!

News Desk

आरएसएसचे संजय जोशी आणि प्रविण तोगडिया यांचा गुजरात निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा – हार्दिक पटेल

swarit

युद्धासाठी पुरेसा दारूगोळा कुठे आहे, कॅगच्या अहवालाने खळबळ

News Desk