HW News Marathi
महाराष्ट्र

भारतात हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे ३.२८ कोटी उत्पादन, तर देशाला १ कोटी गोळ्याची गरज | आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधितांची संख्या ६७६१ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत २०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१० एप्रिल) माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही गोळी उपायकारक ठरत आहे. सध्या भारत ३.२८ कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्या उपलब्ध आहे. तर तर भारताला १ कोटी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्याची गरज आहे. अतिरिक्त गोळ्या निर्यात केल्या जात असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

देशभरात ५१६ जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांत ८९६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. तर देशात गेल्या ४८ तासात १४८७ कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाने दिली आहे. भारत सरकारने 20 हजार 473 विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं आहे.

देशात कालपर्यंत (९ एप्रिल) १६००२ लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र, यातून केवळ ०.२ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्टी झाले, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात कोरोनाचे टेस्ट १४६ सरकारी प्रयोगशाळांमध्ये केली जात आहे. तर ६७ खासगी प्रयोगशाळांनाही कोरोनाची टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुणाला किती मुलं होती,कुणाचं लग्न झालं होतं,सांगू का ? मुंडे प्रकरणावरून अजित पवारांचा विरोधकांना इशारा !

News Desk

‘छगन भुजबळांनी इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार घ्यावा,’ आम्ही पाठिंबा देऊ भाजपा!

News Desk

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी!

News Desk