HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुमच्या हातात असेल तर आताच अटक करा!’, संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

शिरूर। महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. राज्यपालांवर मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल त आताच अटक करा, असं आव्हानच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो

संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. “मी राज्यपालांवर टीका केली नाही. राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असं राऊत म्हणाले. राऊतांच्या दंडात ताकद आहे का? या चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते

संजय राऊत हे शिवसेनेसाठी काम का करतात असा सवाल चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता, त्यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते. आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांचे संबंध आहेत. ते कायम राहतील. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत दादांनी त्याची चिंता करू नये. सरकार पडणार पडत नाही आणि पडणारही नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी काल राऊतांवर टीका केली होती. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोव्हीड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला होता. यापूर्वी राज्यातील मंदिरे उघडण्यावरुनही चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.

तो छोडेंगे नही

आम्ही पाठीत खंजीर खूपसत नाही. समोरून कोथळा बाहेर काढतो, राऊत यांच्या या वक्तव्याचा पाटील यांनीही चांगलाच समाचार घेतला. हम किसी को टोकेंगे नही, अगर किसीने टोका तो छोडेंगे नही, असं पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे काय अॅक्शन घेणार आहेत हे त्यांनी सांगावं. नारायण राणेंनी एक थोबाडीत मारली असती तर असं म्हटलं होतं. त्यावर त्यांना अटक केली. मग कोथळा काढला असता किंवा कोथळा काढू यावर काय करणार आहात? हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, असं पाटील म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk

पवारांना प्रत्येक नागपूर कर गुंड वाटू लागले !

News Desk

ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही आणण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk