HW News Marathi
महाराष्ट्र

३-४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा गायब; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई। ३ ते ४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढील ३ ते ४ महिने काय करतात, हे मला माहित नाही, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून राज्यातील जातीपातीचे राजकारण सुरू झाले, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावर शरद पवार यांनी आज (३ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मनसेच्या गुढीपाडवा निमित्ताने पार पडलेल्या मेळाव्यात महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर राज ठाकरेंनी तोफ डागली.

शरद पवार म्हणाले, “बरेच महिने ते भूमिगत झाले होते, ते कुठे आहेत. हेच कळत नव्हते, राज ठाकरे हे सार्वजनिक जीवनात पुन्हा सक्रिय होण्यास ते उत्सुक असल्याचे कालच्या सभेतून दिसून आले. त्यांचे वैशिष्ट्य आहे की, ३ ते ४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढील ३ ते ४ महिने काय करतात, हे मला माहित नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून राज्यातील जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाले, असा आरोप राज ठाकरेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त द्वेष करने शिकवले. आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, “दरम्यान, “बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केले गेले. ते काही म्हणाले की ते ब्राह्मण आहेत, ” असेही म्हणत त्यांनी टीका केली. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांसाठी 10 हजारांची फौज आणत, शस्त्र पुरवतो’, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त विधान

News Desk

राज्यात सामाजिक समता सप्ताह सुरु

News Desk

शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन तुमच्या पाठीशी! – डॉ. नितीन राऊत

Aprna