HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई- राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सुमारे 32 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरल्याची माहीती हाती आली आहे. ३३ जिल्ह्य़ांमधून ३२ लाख ८ हजार अर्जाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी २६ लाख ७२ हजार ८५७ अर्ज शासन स्तरावर स्वीकारण्यात आले आहेत. येत्या १ ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँकखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असून कर्जमाफी आणि पिकविम्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पार्थच्या ट्विटबद्दल मला काहीच माहीत नाही ! रोहित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाच आंदोलन करू, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील टोल वसुली आज मध्यरात्रीपासून बंद

swarit
देश / विदेश

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

वी दिल्ली- आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. चार वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत. मात्र, अद्याप पीडित महिलेची साक्ष घेण्यात आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिले असून त्यानंतरच आसाराम बापुच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

76 वर्षीय आसाराम बापुने 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. ऑगस्ट 2013 पासून राजस्थान कारागृहात ते बंद आहेत. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात आसाराम बापू यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुजरात सरकारने आसाराम बापूंमुळेच खटल्याला उशीर होत असल्याची माहिती दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर साक्षीदारांचा जबाब तात्काळ नोंदवण्याचा आदेश दिला होता. जवळपास 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

Related posts

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

News Desk

मुंबईत आल्यावर कंगनाला होम क्वारंटाईन व्हावे लागेल ! | महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

मल्लिकार्जुन खरगे काँग्रसेचे नवे अध्यक्ष

Aprna