HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीसाठी 32 लाख शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई- राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सुमारे 32 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरल्याची माहीती हाती आली आहे. ३३ जिल्ह्य़ांमधून ३२ लाख ८ हजार अर्जाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी २६ लाख ७२ हजार ८५७ अर्ज शासन स्तरावर स्वीकारण्यात आले आहेत. येत्या १ ऑक्टोबरपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँकखात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असून कर्जमाफी आणि पिकविम्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांना मनसे नेते अविनाश जाधव यांचा सवाल!

News Desk

नवाब मलिक याचं ट्विटर वॉर सुरूच, वानखेडेंवर पुन्हा हल्लाबोल!

News Desk

हेमंत नगराळे यांची  महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी

News Desk
देश / विदेश

अहमदाबादेत मुस्लिमांनी केली मंदिराची स्वच्छता

News Desk

अहमदाबाद गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी येथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होतआहेत.

धानेरामध्ये सिद्धिविनायक गणपती आणि सतीमाता मंदिर असून या मंदिरांमध्ये जवळपास ८ ते १० फूट पुराचे पाणी भरले होते. हे पाणी ओसरल्यानंतरमंदिरात चिखलाचा थरच लागला होता. १५ ते २० मुस्लिम बांधवांनी हा सगळा चिखल बाहेर काढून मंदिर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. जमिया उलेमा ए हिंदचे हेकार्यकर्ते पालमपूर येथून आले होते. पुराचा तडाखा बसलेल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले होते. मी एकटाच सफाई करत असल्याचे पाहून त्यांनीमदतीचा हात पुढे केला. सुमारे दोन तास श्रमदान करून त्यांनी पूर्ण मंदिर स्वच्छ केलं. गणपती मंदिरानंतर त्यांनी जवळच असलेल्या सतीमाता मंदिरातही साफसफाईकेली असे, येथील पुजऱ्याने सांगितले.

Related posts

भाजपने पूर्णवेळ तंदुरुस्त नेता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमावा – काँग्रेस

Gauri Tilekar

भीषण स्फोटात इमारत जमीनदोस्त, सात ठार

News Desk

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ दोन खेळाडूंना कोरोनाची लागण…

News Desk