HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शहांचे विमानतळावर स्वागत, कलम ३७० रद्द केल्याबद्दल ३७० तोफांची सलामी

बीड | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे औरंगाबाद विमानतळावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वगत केले. यानंतर शहा दसरा मेळाव्यासाठी बीडच्या सावरगाव घाटच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्याच्या स्वागतासाठी पंकजा मुंडे ३७० तोफांची सलामी आणि ३७० तिरंगी झेंडे लावत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. दरम्यान सावरगावात जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यंदा गोपीनाथगड येथून परळी ते भगवानभक्ती गड अशी रॅली काढण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध होऊ लागल्याने मागील तीन वर्षापासून पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट या संत भगवान बाबांच्या जन्म गावात मागील दोन वर्षापासून दसरा मेळावा होत असून यंदाचे तिसरे वर्ष आहे.

या मेळाव्यात प्रत्येक व्यक्तीच्या मागे २५ भगवे झेंडे लावण्यात येणार आहे असून खास काश्मीरमधील ३७० कलम हटवल्याबद्दल ३७० तोफांची सलामी आणि ३७० तिरंगि झेंडे लावण्यात येणार आहे. शहा यांच्या दसऱ्या मेळाव्याचा फायदा संपूर्ण बीड जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांना ही मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग झाला मोकळा, मात्र भाजपला बसला धक्का

News Desk

अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, आठवलेंचा विश्वास

News Desk

HW Exclusive : हे सरकार चोऱ्या करायला बसले; पडळकरांचे सरकारवर हल्लाबोल

Aprna