HW News Marathi
महाराष्ट्र

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत ५ जणांचा मृत्यू, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई। ‘कोव्हीशिल्ड’ लशीची निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नव्या इमारतीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी BCG लशीची निर्मिती केली जाते त्या ठिकाणी आज (२१ जानेवारी) दुपारी २ च्या सुमारास आग लागलेली आहे. हा भाग सीरमचा मांजरी भागातील नवा प्लांट असून वेल्डिंगच्या कामादरम्यान ही आग लागली आणि पुढे वाढत गेली. ही आग सद्यस्थितीत विझवण्यात आली असून त्यासाठी २ ते ३ तास लागल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर मुंबईत थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपेंनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, सीरममध्ये ज्या ठिकाणी BCG लशीची निर्मिती होते त्या ठिकाणी ही आग लागली आहे. हा सीरमचा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. इथे बिल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी वेल्डिंगचे काम सुरू असतानाच स्पार्कमुळे ही आग लागली आणि पुढे वाढत गेली. सद्यस्थितीत ही आग विझवण्यात आली आहे. ही आग नियंत्रणात यायला जवळपास २ ते ३ तास लागले. त्यानंतर पाहाणी दरम्यान या आगीत ५ जणांचे मृतदेह आढळले”, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे, कोरोना लशीच्या निर्मितीच्या ठिकाणापासून हे आग लागलेले स्थळ लांब असल्याने या आगीत कोरोना लशीचे नुकसान झाले नसल्याचेही यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या! – अजित पवार

Aprna

भाजपला काँग्रेसच रोखू शकतं, नाना पटोलेंचा दावा;तर दरेकरांचं प्रत्युत्तर

News Desk

माळीणमधील नागरिकांनी उद्ध्वस्त तळीये गावासाठी दिली 25 हजाराची मदत….!

News Desk