HW News Marathi
Covid-19

राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्यातून ७० बसेस रवाना

धुळे | देशभरातील लाखो विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथे जातात. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा त्यात समावेश असतो. दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीर संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फक्त या सर्व विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकांनी शासनास विनंती केली होती. आता परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. कोटा येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यशस्वी बोलणी करुन आज (२९ एप्रिल) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून 70 बसेस रवाना केल्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी यासंदर्भात चर्चा केली होती.

येत्या २ दिवसांत या बस राज्याबाहेर अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन माघारी येतील, अशी माहिती मिळत आहे. कोटामधील (राजस्थान) विद्यार्थ्यांना लवकरात लवकर माघारी आणण्याची विद्यार्थ्याच्या पालकांची मागणी लक्षात राज्य शासनाने राज्याच्या उत्तर सीमेवरील व कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यातून बसेस सोडण्याचे नियोजन केले. यासाठी राज्याचे महसुल राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्री यांच्याशी चर्चा करुन धुळे जिल्ह्यातील ७० बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली व आज त्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार आज (२९ एप्रिल) धुळे येथून ७० बसेस कोटाकडे रवाना झाल्या आहेत.

धुळे ते कोटा हे 630 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटायझ करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा येथे पोहोचतील. व त्यानंतर त्या राज्यातील विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिरम इन्स्टिट्यूटच्या मानवी चाचणी दरम्यान मेंदुरवर परिणाम झाल्याचा स्वयंसेवकाचा आरोप

News Desk

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

News Desk

कोरोनावर मात केल्यानंतर राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

News Desk