HW News Marathi
Covid-19

शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत !

मुंबई । “महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे”, अशी बोचरी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेवर गोपीचंद पडळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “सगळं गावच करील तर सरकार काय करील?”, असा बोचरा सवाल उपस्थित करत राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना देखील यावेळी गोपीचंद पडळकर यांनी टार्गेट केले आहे.

“महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचते ?”, असा सवालही पडळकरांनी केला आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या या टिकेनंतर आता हसन मुश्रीफ यांच्याकडून काही प्रत्युत्तर येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कामचुकार मंत्री ! पडळकरांचा निशाणा

“नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही कोरोनामुक्त गावाची स्पर्धा आणली आहे. सगळं गावच करील तर सरकार काय करील? हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडला आहे”, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी हसन मुश्रीफ यांना डिवचले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहावीच्या परीक्षांसाठी उच्च न्यायालय तर बारावीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष

News Desk

जाणून घ्या… उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्या आजच्या भेटीमागचे खरे कारण

News Desk

धारावी कोरोना मॉडेलचं जगभरात कौतुक, फिलिपिन्समध्ये धारावी मॉडेल राबवणार

News Desk