HW News Marathi
महाराष्ट्र

संकटाच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्याअर्थाने तारणारा, सर्वसमावेशक अर्थसंकल्प !

मुंबई | महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज (८ मार्च)सादर केला यात कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन, आलेली संकटे समोर असताना देखील आणि राज्य सरकार मोठे अडचणीत असताना देखील अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला तारणारा अर्थसंकल्प सादर केला याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, कोरोनासारखे जागतिक संकट असूनही राज्याला पुन्हा प्रगतीकडे नेणारा सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे.कोरोनाच्या संकटाने आरोग्य विषयक अनेक आव्हाने राज्यासमोर असताना अजित पवार यांनी आरोग्याला केंद्रस्थानी ठेवतच सर्वच विभागासाठी भरीव तरतुद केली आहे. आज महिला दिन आहे त्यामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठीची सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी प्रवास सवलत योजना राबवण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेण्यात येणार असल्याने राज्यातील मुलींना याचा फायदाच होणार आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले आहे यामध्ये राज्यसरकाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहू, तांदूळ, तूर, मका, इ धान्याची पुरेशी साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी नाबार्डच्या साहाय्याने राज्यात 280 नवीन गोदामे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी आत्तापर्यंत 334 कोटीरुपये उपलब्ध झाले असून 2021-22 या वर्षासाठी 112 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर चालू वर्षासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास 321 कोटी प्रस्तावित केला आहे आणि यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत.

नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा अर्थसंकल्प

नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या सततच्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आज त्याचा पुनरुच्चार देखील अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला. नाशिक सारख्या धार्मिक भूमीचा अधिक विकास करण्यासाठी सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर जतन संवर्धन,श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थ स्थळ विकास, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास, श्री क्षेत्र सप्तशृंगी गड विकास यासाठी भरिव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर पुणे ते नाशिकच्या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यासाठी निधी आणि नाशिकच्या निओ मेट्रो साठी राज्य शासनाच्या वाट्याची तरतूद केल्यामुळे संपुर्ण नाशिकच्या जनतेच्या वतीने छगन भुजबळ यांनी अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात उद्योग येणार, तरुणांना रोजगार मिळणार!

News Desk

कुलाबा, ठाणे, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ! – अमित देशमुख

Aprna

‘कर्ज फिटले साहेब, आता लेकीच्या लग्नाला या’, शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना आपुलकीचे आमंत्रण

News Desk