HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणतात….

मुंबई | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या दुर्घटना घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक, विरार आणि त्यानंतर ठाणे येथील रुग्णालयांमधील दुर्घटनांमुळे राज्य सरकारच्या कोरोनाविरोधातील लढ्याला हानी पोहोचली आहे. मात्र, या सगळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या या टीकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“एखादी दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कोणीही तिथं गेलं की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते. व्हीआयपी व्यक्तीने भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं असतं त्यासंबंधी सूचना देत असतात. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसं सुरु असतं हे पाहायचं असतं आणि सध्या तेच अपेक्षित आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

“फक्त आपल्याच नाही तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून हे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचं असतं ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “आम्ही गेल्यावर तिथे गोंधळ होतो. अर्धा पाऊण तास सगळं काही थांबलेलं असतं. आम्ही बाईट देत असतो, नंतर प्रसारमाध्यमं व्हीआयपी दौरा, टुरिझम अशी टीका करतात. सांत्वन फक्त टीव्हीवर येऊन करायचं नाही, तर कुटुंबाशी बोलून मदत कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे”.

“प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात. एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते,” असं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खानदेशात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

News Desk

बाबरीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा आनंद काय घेताय? – संजय निरुपम

News Desk

ग्रामीण भागात 17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी तर शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग होतील सुरू!

News Desk