HW News Marathi
महाराष्ट्र

संचारबंदी लागू केली तरी नवी बंधने लादण्यात आलेली नाही, आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

मुंबई | मुंबई पोलिसांनी काल(१७ सप्टेंबर) शहरातील जमावबंदीची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवली आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि टाळेबंदी शिथिल करताना सरकारने मुभा दिलेल्या व्यक्ती, सेवा, व्यवसायांना सूट असणार आहे. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामुळे संपूर्ण टाळेबंदी, संचारबंदी जारी होणार, असा गैरसमज पसरला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून या आदेशान्वये नवी बंधने लादण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकांचा संभ्रम दूर झाला आहे.

अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय आणीबाणीसह अत्यावश्यक सेवा आणि शासनाची परवानगी असलेल्या व्यक्तींना संचारबंदीचे नियम लागू नसणार आहेत. शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली आहे. या प्रत्येक टप्प्यात ठराविक सेवा, व्यवसायांना मर्यादीत प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. शासनाने मुभा दिलेल्या सेवा, व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती पुर्वीप्रमाणेच प्रवास करू शकतील,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पीक विम्याबाबत राज्य सरकारची, केंद्राला विनंती’, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या शरद पवार!

News Desk

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ! – दादाजी भुसे

Aprna

नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी!

News Desk