HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे

मुंबई | आषाढी एकादशीनिमित्त आज (१२ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपूरच्या श्रीविठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली आहे. “महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे”, असे मागणे मुख्यमंत्र्यांनी मागितले आहे. लाखो किलोमीटरचा प्रवास करून आलेले लाखो वैष्णव गुरुवारी (११ जुलै) पंढरपुरात दाखल झाले. आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर असलेले हे वारकरी आज आपल्या विठुरायाचे दर्शन घेतील. यंदाच्या वर्षी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधून साधारणतः १५ लाख वारकरी पंढरीनगरीत दाखल झाले आहेत.

राज्याच्या वर्षानुवर्षाच्या परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. गेली २० वर्षे वारी करणारे लातूरमधील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हाण आणि आणि त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांना वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या पूजेला बसण्याचा मान मिळाला. महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीच्याकडून मुख्यमंत्र्यांसह तेथे उपस्थित मंत्र्यांचा, पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणात पत्रकार परिषदेतून अमिताभ गुप्तांनी हसत काढता पाय घेतला

News Desk

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता ‘या’ ठिकाणी होणार…

News Desk

हलगर्जीपणामुळे अवनीची शिकार, एनटीसीचा ठपका

News Desk