HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : तबलिघी जमातीच्या कार्यक्रममुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग, आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली | दिल्ली तबलिघी जमातच्या मकरझमध्ये धार्मिक कार्यक्रमामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (५ एप्रिल) दिली आहे. यामुळे आज देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ३५७७ वर गेला आहे. आज एका दिवसभरात जवळपास ५०५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘तब्लिगी जमाती’च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा सध्याचा काळ ४.१ दिवस इतका आहे, मात्र तब्लिगीचा कार्यक्रम नसता तर ७.४ दिवस इतका कालावधी अपेक्षित होता.

देशात सध्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट (PPE) किटचा तुटवडा भासत आहे. आपण पीपीई किट आयात करत आहोत. जानेवारीपासूनच सरकारने यावर उपयायोजना सुरू केल्या आहेत. देशातील उत्पादकांनी या पीपीई किटचे उत्पादन केंद्र सरकारन सुरू केल्याची माहती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार!

News Desk

पोलीस मुख्यालयात धनंजय मुंडेंसमोर; बोगस रस्त्यावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Aprna

आमदार रवी राणा यांना रॅलीदरम्यान आली भोवळ

Aprna