HW News Marathi
महाराष्ट्र

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार!

ठाणे। ठाण्यात एक भयानक प्रकार भल्या पहाटे घडला आहे. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आज(१२ सप्टेंबर) पहाटे ठाण्याती राबोडी परिसरात ही दुर्घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

ठाण्यातील राबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही तळ मजला अधिक चार मजली इमारत आहे. आज पहाटे 6 वाजता सर्वजण साखर झोपेत असतानाच इमारतीच्या तिसऱ्या माजल्यावरील छताचा भाग कोसळला. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले. तर अचानक काही तरी पडण्याचा आवाज आल्याने इमारतीतील इतर लोक जागे झाले आणि त्यांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे.

दोन जण दगावले

ठाण्यात घडलेल्या या घटनेमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. रमीज शेख (३२), गॉस तांबोली (३८) आणि अरमान तांबोली (१४) या तिघांना जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या तिघांनाही प्रचंड मार लागला होता. त्यामुळे उपचारा दरम्यान रमीज शेख आणि गॉस तांबोली यांचा मृत्यू झाला. तर अरमान हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नागरिकांचं मशिदीत स्थलांतर

ही घटना घडल्यानंतर टीडीआरएफची टीम, आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून ढिगाऱ्याखाली कुणीही अडकलेलं नसल्याचं सांगितलं जातं. तसेच ही संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून इमारतीतील नागरिकांना जवळच्या मशिदीत हलविण्यात आलं आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते”, अजित पवारांनी मोदींना सुनावले 

News Desk

“रोशनी शिंदेंला मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा”, जयंत पाटलांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Aprna

भोंदूबाबाने 3 मुलींवर केला बलात्कार, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली: चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

Aprna