HW News Marathi
Covid-19

चव्हाणांचे डोके ठिकाणावर आहे का?,अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंची जहरी टीका

मुंबई। कोरोनामुळे देशाची अर्थ व्यवस्थेला मोठ्या समस्या सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला चालना देण्यासाठी २० लाख कोटींचा आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मोदींच्या निर्णयाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत केले. त्याचबरोबर केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, सरकारला सुचविला. यावर भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भोसले म्हणाले, चव्हाणांचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. यावरच आचार्य तुषार भोसले थांबले नाही ते पुढे म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण, देवस्थाने खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही? एवढीच जर तुम्हाला सरकारची काळजी आहे, तर तुम्ही ज्यांची हुजरेगिरी करता त्या तुमच्या नेत्यांना सांगा. सोनिया गांधींना सांगा त्यांची संपत्ती सरकारला द्यायला. त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रांना सांगा. पी. चिदंबरमला सांगा. सुरेश कलमाडीला सांगा. सामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांनी घरात पुरुन ठेवला, त्यातला रुपया देण्याची त्यांची नियत नाही आणि लोकांनी श्रद्धेने देवस्थानांना, मंदिरांना दान दिलेली संपत्ती तुम्ही ताब्यात घ्यायला सांगता? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही,’ अशा शब्दांत भोसले माजी मुख्यमंत्र्यांवर बरसले.

भोसले म्हटले ‘या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी सक्षम आहेत. त्यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशासाठी जाहीर केलेय आणि कमी पडले तर अजूनही ते जाहीर करतील आणि तो पैसा कसा आणायचा यासाठीही ते सक्षम असतील. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. कारण तुम्हाला तुमच्या पक्षातही कुठलेही स्थान उरलेले नाही आणि सरकारमध्येही कुठलेही स्थान उरलेले नाही, म्हणून तुम्ही अशी विधान करत आहात. पण एक गोष्टी कान उघडून ऐका. या आमच्या देवस्थानांना मुघलांनी लुटले, इंग्रजांनी लुटले. पण आता आमच्या देवस्थानांना लुटण्याची नियत तुमच्यासारख्या नेत्यांची आणि काँग्रेस पक्षाची असेल, तर हे कदापि शक्य होणार नाही. हा देश आदरणीय पंतप्रधानांच्या हातात अतिशय सुरक्षित आहे,’ असे ते म्हणाले. चव्हाण यांनी त्यांचे विधान ताबडतोड मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय सभा थांबवा, जमत नसेल तर आम्हाला सांगा ! कोर्टाने राज्य सरकारला सुनावलं

News Desk

भाजपशासित राज्यांतच ‘मोदी मॉडेल’चा फज्जा !

News Desk

शिवसेना नगरसेविका काळाच्या पडद्याआड, रणरागिणी सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

News Desk