HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेत्री पायल घोषने राजकारणात एन्ट्री करत हाती घेतला रिपाईचा झेंडा!

मुंबई | चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर अभिनेत्री पायल घोष चर्चेत आली होती. अनुरागने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्याला न्याय मिळावा असे म्हणत अनेक प्रयत्न केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे धाव घेतली होती. यात सगळ्यात तिला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता पायलने हाती आरपीआयचा झेंडा घेत राजकारणात प्रवेश केला आहे.

रामदास आठवलेंनी आज (२६ ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह अभिनेत्री कनिष्का सोनी, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकूर चाफेकर यांनी आरपीआयमध्ये पक्षप्रवेश केला आहे. पायलच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘कायद्यानुसार पायलवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही पायल घोषसोबत आहोत. याप्रकरणी मला पश्चिम बंगालमधूनही फोन आले होते. पायल पश्चिम बंगालची आहे. तुम्ही मुंबईत राहता. तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असं मला सांगण्यात आलं. मी सांगितलं त्यांना की, मला हे सगळं सांगण्याची गरज नाही. मला सगळं माहिती आहे. त्यामुळे या अभिनेत्रीला पाठिंबा देण्याची आमची जबाबदारी होती. त्यामुळेच आम्ही पायल घोषला पाठिंबा दिला. तसेच अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक करण्यात यावी हिच आमची मागणी आहे, असे आठवले म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. आता तिच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा राहणार आहे. पायल घोषला पाठिंबा देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनुरागला अटक करण्याची मागणी केली होती. पायल घोष यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून पायल यांनी घाबरुन जाऊ नये, असं अश्वासन पायल घोषला रामदास आठवले यांनी दिलं आहे.

अभिनेत्री पायल घोष यांच्याशी फोनवर रामदास आठवले यांनी चर्चा केली होती. दरम्यान, या आधी अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतरही आठवलेंना कंगनाला पूर्ण पाठिंबा दिला होता. तसेच, पायल घोष प्रकरणात आता मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून, या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे, या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-वंचित युतीचा फायदा कुणाला? प्रबोधनकार ठाकरेंपासून ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ प्रयोग

Manasi Devkar

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna

राज्यपाल अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले; ‘मविआ’ नेत्यांचे आंदोलन

Aprna