HW News Marathi
Covid-19

सगळ्यांना लस पोहोचवण्यासाठी केंद्राकडे ८० हजार कोटी आहेत का? अदार पुनावालांचा प्रश्न

पुणे | कोरोना कधी जाणार त्यावरील लस कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक भारतीयांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा खर्च ८० हजार कोटी रुपये आहे, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? असा थेट प्रश्न सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लसीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca सोबत करार केला आहे.

पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे असे अदर पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

“मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण, तशी आपल्याला योजना आखावी लागेल. आपल्या देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल” असेही अदार पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE, ICSE बारावी परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्यच ! | सर्वोच्च न्यायालय

News Desk

सोशीअल डिस्टसिंगचे पालन करत के.ई.एम. रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

News Desk

पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात महापौरांनी दिली माहिती!

News Desk