HW News Marathi
महाराष्ट्र

२०१९ च्या निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांचा दावा

लातूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवारी) लातूरमधील अटल महाआरोग्य शिबिराच्या उदघाटनासाठी आले होते. “२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेन,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे. “शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरण आणि सेवासुविधांसाठी तीन टप्प्यात १०० कोटींचा निधी देण्यात येईल. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा तिन्ही टप्प्यातील निधी माझ्याच कार्यकाळात मिळेल. कारण २०१९ च्या निवडुकांनंतरही मीच मुख्यमंत्री असणार आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“यंदा मराठवाड्यात ७० टक्क्यांपेक्षा देखील कमी पाऊस झाला आहे.मात्र या कठीण परिस्थितीत सरकार खंबीरपणे लोकांच्या पाठीशी आहे. आधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना केवळ ७ हजार कोटींची मदत मिळाली होती. मात्र आम्ही फक्त चार वर्षांत २२ हजार कोटींची मदत दिली आहे. २०२२ पर्यंत १२ लाख बेघरांना घर मिळेल,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस ‘आयुष्यमान भारत योजने’चीही माहिती दिली आहे.

यंदा महाराष्ट्रात मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती आहे. यासंदर्भात पंचनामा सुरु आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाईची स्थिती समोर येईल. यासंदर्भात केंद्राची पाहणी पूर्ण झाल्यानंतर तेथे दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यानी यावेळी दिली आहे. त्याचप्रमाणे “मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या लढ्यात सरकार मागे हटणार नाही,” असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया 

News Desk

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’

News Desk

“मुंबईचे डबेवाले” शक्ती आणि भक्तीचे प्रतीक! आदित्य ठाकरे

Aprna