HW News Marathi
Covid-19

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अन्य क्षेत्रांसह शाळाही बंद होत्या. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठीही योग्य ती संपूर्ण जबाबदारी घेऊन राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज (७ नोव्हेंबर) जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि दिवाळी या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अनलॉकदरम्यान प्रत्येक क्षेत्र खुले करताना जबाबदारीने वागणे हे या काळात अत्यंत आवश्यक आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा इ. उपस्थित होते. यावेळी राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णयासह मुख्यमंत्र्यांनी काही सूचनाही केल्या आहेत. “शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना चाचणी यासह सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक असून खबरदारीचा उपाय म्हणून एखादा विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीची प्रकृती ठीक नसल्यास पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये” असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त !

News Desk

उद्धव ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरण टाळता आले असते !

News Desk

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

News Desk