HW News Marathi
Covid-19

विदुषकाची गरज, शरद पवारांच्या राजनाथ सिंहांवरील टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई | राज्यात महाविकसाघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून वारंवार भाजपकडून त्यांच्यावर टीका होत असते. राज्यात सध्या महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार हे सर्कस सुरू आहे, अशी टीका केंद्यी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (९ जून) कोकण दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देते शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल तर त्यांना आता एका विदुषकाची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला

या प्रकरणात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे हे शरद पवार यांनी मान्य केले. त्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहे हे देखील त्यांनी मान्य केले,” ते म्हणत शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या टीकाला चंद्रकांत पाटील यांनी पलवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात ही प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे पाहावे लागेल. मात्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला ट्वीट करून उत्तर दिले आहे. आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “चंद्रकांत पाटील जनाची नाही तर मनाची लाज बाळगा,” अशा शब्दा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समचार घेतला.

राजनाथ सिंह काय म्हणाले

“महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे, अशी टीका केंद्रीय संरक्षणमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार हे कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहे,” असेही ते म्हणाले. राजनाथसिंह यांनी काल (८ जून) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘महाराष्ट्र जनसंवाद रॅली’ संबोधित करणाता ते बोलत होते.

शरद पवार नेमके म्हणाले

“महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल तर त्यांना आता एका विदुषकाची गरज आहे,” असा टोला ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना लगावाल आहे.

नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

“महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोविडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल” अशा आशयाचे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल, तर एका विदुषकाची गरज !

सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ आहेत !

महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusve | वाईन शॉपच्या राज ठाकरेंच्या मागणीवर मनसे नेते काय म्हणाले?

swarit

IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा, मुख्यमंत्र्याचे निर्देश

News Desk