HW News Marathi
Covid-19

‘त्या’ विधानानंतर राहुल गांधी अन् मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा

मुंबई | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल (२६ मे) फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी बोलताना, “कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी काँग्रेस पूर्णपणेसोबत आहे”, असे आश्वासन राहुल गांधींकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी काल म्हणजेच मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र काँग्रेसबाबत एक अत्यंत मोठे वक्तव्य केले होते. “महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नाही”,असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे राहुल गांधींच्या ‘या’ विधानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्यात झालेली ही बातचीत महत्त्वाची ठरते.

“महाराष्ट्रामधील सरकारला काँग्रेसने समर्थन दिले आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याइतके अधिकार नाही”, असे राहुल गांधी म्हणाले. “महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. काय सांगाल ?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता राहुल गांधींनी हे उत्तर दिले. “दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाही. एखादे सरकार चालविणे आणि सरकारला पाठिंबा देणे ह्यात मोठा फरक आहे. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल | सामना रोखठोक

News Desk

जाणून घ्या… उद्धव ठाकरे यांच्याकडे किती आहे संपत्ती !

News Desk

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २७,८९२, तर एका दिवसात ३८१ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk