HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकरांकडून दिलगिरी व्यक्त

शिर्डी | ‘स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे वादग्रस्त विधान प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले होते. यानंतर सर्व स्तरातून इंदोरीकरांवर टीका होईल लागल्यानंतर त्यांनी पत्रक जाहीर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. २६ वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे पत्रकात जाहीर केले आहे.

इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकरांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचे समितीच्या सदस्याने म्हटले आहे. “मी इंदोरीकर महाराजांचे समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल ते विधान करायला नको होते. पण, दिवसरात्र किर्तने करून तो माणूस समाज प्रबोधनाचे काम करतात. मात्र, एका वाक्याने व्यक्ती वाईट होत नाही,” अशी मवाळ भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याबद्दल घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल (१७ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होती.

इंदोरीकरांनी पत्रात काय नेमके म्हणाले

रामकृष्ण हरी

महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि मातासमान असलेला तमाम महिला वर्ग, आजतागत आठ दिवसांपासून माझ्या कीर्तनरुपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल आणि इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.

तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटन अंधश्रद्धा निर्मूलन आणि विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, हीच सदिच्छा!

महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर भाजपसमोर महाविकासआघाडीचा निभावही लागणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

News Desk

“दत्तक घेतलं म्हणजे रोज महापालिकेत दलाली खायची असं नाही” – फडणवीस

News Desk

मोदी जगभ्रमणावर, तर शहा देशभ्रमणावर

News Desk