HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, ९०० गावे दुष्काळ ग्रस्त यादीत

मुंबई | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठीचा जीआर राज्य सरकारकडून आज किंवा उद्या काढला जाऊ शकतो.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठीचा जीआर राज्य सरकारकडून आज किंवा उद्या काढला जाऊ शकतो. सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकार कडून हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.

याआधी १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५० मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. राज्यात ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. तर आता ९०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये खालील जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. सांगली, सातारा, धुळे, पालघर, जळगाव, सोलापूर, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, पुणे, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा. यामध्ये काही गावात गंभीर स्वरुपाचा तर काही गावात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

News Desk

औरंगाबादेतील सिल्लोड जळीतकांडामधील पीडित महिलेचा मृत्यू

swarit

मलिकांच्या राजीनाम्याबद्दल छगन भुजबळाचे मोठे विधान

Aprna