HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : पंतप्रधान मोदींच्या सभेनंतरही ‘या’ भाजपच्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव

मुंबई | यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दारुण पराभव करणासाठी भाजपने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकूण ९ सभा घेतल्या होत्या. यामध्ये जळगाव, सातारा, परळी, मुंबई (वांद्रे), खारघर, पुणे, परतूर, अकोला आणि भंडारा यांचा समावेश होता. यात सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोदींनी परळीत सभा घेतली. मात्र, मोदींच्या सभेतच्या निकालात काही बदल झालेला दिसून आला नाही. धनंजय मुंडे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले.

तसेच लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी अवघ्या काही महिन्यात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करत खासदारकीचा राजीनामा दिला आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा पोटनिवडणुकीत घेण्यात आली यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात उदयनराजेंना तिकीट देऊन चूक केल्याचे मान्य केले. आणि चुकी दुरुस्त करून श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी निवडून आण्याचा सातारकरांना आवाहन केले. पोलनिवडणुकीच्या निकालानंतर सातारकरांनी श्रीनिवास यांना विजयीत केले.

मुंबईमध्ये मोदी व उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली आणि मुंबई व कोकणाने युतीला पुन्हा सत्ता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या पदरी अपयश आले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युध्दपातळीवर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश

News Desk

डिझेल परताव्याचे १२ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यता! – अस्लम शेख

Aprna

“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”, भाजप सरपंचाने दिला राजीनामा

News Desk