HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणतात,सरनाईकांबद्दल लवकरच बातमी मिळेल !

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र आणि त्यात भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला या सगळ्या कारणांवरून अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेनेत गेल्या काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला असून लवकरच बातमी कळेल, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवास्थानी भेट घेतली. दुपारी १२.३० ते २.३० पर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भाजपची जुळवून घ्या, असं पत्र लिहिणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्याबद्दलही या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यांनी सांगितल की,

प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो होतो. त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितलं मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. आम्हाला जाणवलं काही केंद्रीय यंत्रणा मुद्दामून ‘वडाचं साल पिंपळाला’ लावण्याच प्रयत्न करत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनतेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अस देखील संजय राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पण माझी आज चर्चा ही आमच्या पक्षप्रमुखांशी झाली. संघटनात्मक गोष्टींवर चर्चा झाली. पक्ष मजबूत असेल तर सरकार अधिक काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. संघटनेचे कामं करणं गरजेचं आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू होतंय , त्या संर्भात मुख्यमंत्र्याचं त्यावर काम सुरू आहे’ असं राऊत यांनी सांगितलं.

कोणी काहीही ढोल बडवले तरी…

उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत बोलताना संजय राऊत असंही म्हणालेत , मी पक्षप्रमुखांची भेट घेतली आहे आणि चर्चा देखील झाली आहे. बाहेर चर्चा व्हावी असं विशेष काही नाही. सगळं स्थिर स्थावर आहे. महाराष्ट्राच्या विकासाविरोधात कोणी काहीही ढोल बडवले, तरी हे राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, त्यांचा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण होईल. शरद पवारांचा राजकीय मेसेज एवढाच आहे की ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तम काम करत आहे. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतेय. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारला फायदाच होणार आहे.शरद पवारांनी प्रशांत किशोरांना भेटावं की आणखी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न. पवारसाहेब देशातील महत्त्वाचे नेते आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षांची ताकद वाढेल तेव्हढा सरकारवर अंकुश राहील, असेही राऊत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळ पडली तर सरकार पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कर्जही काढेल !

News Desk

राज्यातील नवनिर्वाचित २८८ पैकी २८२ आमदारांचा शपथविधी संपन्न

News Desk

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार | मुख्यमंत्री

News Desk