HW News Marathi
महाराष्ट्र

…तर डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्नसुद्धा भाजपचे गाजरच !

मुंबई | “राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न सुद्धा भाजपचे गाजरच आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसले. त्यामुळे, याचे पडसाद निश्चितच अधिवेशनातही उमटण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (१७ जून) सुरुवात झाली असून सरकारच्या वेबसाईटवरुन विधीमंडळांचे कामकाज प्रसारीत होत नाही. त्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “विधीमंडळाच्या वेबसाईटवरील थेट प्रक्षेपण बंद असल्याने जनतेला अजूनही पावसाळी अधिवेशन पाहता येत नाही. डिजिटल महाराष्ट्र केवळ जाहिरातीपुरताच आहे असा संदेश सरकार देत आहे का ?” असा टोला अजित पवार यांनी सरकारला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

News Desk

नाताळ अन् नवीन वर्षासाठी राज्य सरकारकडून नवे निर्बंध

Aprna

हसन मुश्रीफांच्या विरोधात किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द!

News Desk