HW News Marathi
महाराष्ट्र

“याला कोण जबाबदार आहे? केंद्राने विचार करावा” जनआशीर्वाद यात्रेच्या गर्दीवरुन अजित पवार संतापले!

पुणे । पंतप्रधान नरेंद मोदींच्या आदेशावरून भाजप नेत्यांची जनाशीर्वाद सुरु आहे. या यात्रेवरून आधीच भाजप आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये टिकबाजी सुरु होती. अचानक वाढणाऱ्या कोरोनाच्या संख्येमुळे गृह मंत्रालयही चिंतेत आहे. याबाबत गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. आता, या पत्रानंतर राज्यातील जनआशीर्वाद यात्रेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहेत.

याला कोण जबाबदार आहे? केंद्राने विचार करावा

कोरोनाचं संकट कमी अजूनही झालेलं नाही, म्हणून राज्यसरकारने सणांवरही निर्बंध लावले आहेत. अश्यातच भाजप नेत्यांच्या जनाशीर्वाद यात्रेमुळे होणाऱ्या गर्दीने कोरोनाचं संकट पन्हे वाढणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. आपल्याकडे अनेक सण आनंदाने करतो. एकीकडे केंद्र सरकार सांगतं कोरोना आहे काळजी घ्या. चार नवीन मंत्र्यांना मात्र यात्रा काढायला सांगितलं जातं. याला कोण जबाबदार आहे? नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असं ते म्हणाले. जिथं राजकारण करायच आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जिथं जनतेचा प्रश्न आहे, तिकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्या, असं आवाहन अजित पवारांनी नागरिकांना केलं आहे.

त्यांनी केंद्राची कामे करावी, आम्ही राज्यातील कामं करणार

नारायण राणे यांनी अजित पवारांवर आज(३० ऑगस्ट) निशाणा साधला आहे, त्यालाही पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केसेस कशा रद्द करायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असा टोला केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लगावला होता. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मला नारायण राणे बाबत चर्चा करायची नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. आम्हाला सरकार चालवायच आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. आम्ही राज्यात मंत्री आहोत. त्यांनी केंद्राची कामे करावी, आम्ही राज्यातील कामं करणार, असं ते म्हणाले आहेत.

अजित पवार अजून अज्ञान आहेत

नारायण राणे यांनी या जनाशीर्वाद यात्रेत सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या टिकेचा समाचार घेतला. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. ‘आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे,’ असेही ते म्हणाले आहेत.

निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते,‘सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामे पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होते. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत.’ अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसेच ‘आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं,’ असा टोलाही पवारांनी लगावला होता.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC आयुक्त इक्बालसिंग चहल यांना आयकर विभागाची नोटीस

Aprna

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात!

News Desk

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

Aprna