HW News Marathi
महाराष्ट्र

कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी -अजित पवार

पुणे | कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करताना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलिसांनी सामान्य नागरिकांना सेवा द्यावी. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘सेवा’ उपक्रम, ‘एक्स ट्रॅकर’ उपक्रमाचा शुभारंभ आणि विविध सोशल मिडीया पेजेस लोकार्पण तसेच स्मार्ट आयएसओ पोलीस ठाणे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. पोलिसांकडून उत्कृष्ट सेवेची अपेक्षा करीत असतांना त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची आमची जबाबदारी आहे. नागरिकांना सुरक्षितता वाटावी म्हणून राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढत, गुन्हेगारांना धडा शिकवला पाहिजे, असे सांगून राज्य शासन कायम आपल्यासोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, समाज माध्यम हे जगभरात जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. समाज माध्यमे वापरत असताना काळजी घेतली पाहिजे. नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घेत समाजात अचूक माहिती प्रसारित केली पाहिजे. या कामासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना देत समाज माध्यमाचा जनहितासाठी पुरेपूर वापर झाला पाहिजे. नागरिकांना उत्तम सेवा देत असतांना चांगले उपक्रम राबविले जावेत. नागरिक विश्वासाने पोलिसांकडे येत असतात त्यांच्या प्रश्नांची उकल करत त्यांचे समाधान झाले पाहिजे.

ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भिती असते त्यांना सुरक्षितता वाटावी अशाप्रकारची सेवा पोलीसांनी दिली पाहिजे. स्कॉटलँड पोलीसानंतर आपल्या पोलीस दलाचे नाव घेतले जाते याचा सार्थ अभिमान आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सेवा उपक्रम, एक्स ट्रॅकर उपक्रमांच्या माध्यमातून चागंली सेवा नागरिकांना मिळावी अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘सोशल एन्जल’ या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल महासेतुचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार गौरीधर, ग्रायफॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शशी भट, एमआयटी विद्यालयाचे प्राचार्य किशोर रवांडे, एक्स ट्रॅकरचे प्रकल्प अधिकारी समाधान महाजन तसेच आयएसओ प्रमाणित पोलीस स्थानकांच्या वरिष्ठ निरीक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची बदली करवीर, कोल्हापूर येथे झाल्याने त्यांचा सत्कारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केला तर… मुख्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच!

News Desk

मला पाडून दाखवा ,अजित पवारांचं मुनगंटीवारांना चॅलेंज !

News Desk