HW News Marathi
महाराष्ट्र

माघी गणेश जयंतीनिमित्त आणि क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई | “सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायांना माघी गणेशजयंतीच्या निमित्तानं भावपूर्ण वंदन करतो. श्री गणरायांनी राज्यावरचं, देशावरचं कोरोनाचं संकट दूर करावं. सर्वांना स्वच्छंद फिरता येईल, असं कोरोनामुक्त वातावरण पुन्हा निर्माण व्हावं. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात भरभराट व्हावी. जनतेच्या जीवनातील दू:खं दूर होऊन प्रत्येकजण सुखी, समाधानी, आनंदी व्हावा, अशी प्रार्थना मी श्री गणरायांच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माघी गणेश जयंती साजरी करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तसेच, थोर समाजसुधारक, क्रांतीकारी संत सेवालाल महाराजांनी समाजातील अज्ञान, अनीती, अंध:श्रध्दा, व्यसनाधीनता, जातीव्यवस्थेसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. समाजात महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्य आणि अहिंसा हाच खरा धर्म हे त्यांनी सांगितले. प्राणीमात्रांवर, निसर्गावर प्रेम करण्याची शिकवण त्यांनी दिली. मानवतेच्या, प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार दिला. संत सेवालाल महाराजांनी केलेले कार्य आणि दिलेले सर्वांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले आहे.

संत सेवालाल महाराजांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संत सेवालाल महाराज हे त्यागी, दूरदर्शी आणि बुध्दीप्रामाण्यवादी विचारांचे महान संत होते. ‘कोणतीही बाब आधी माहित करून घ्या, शिकून घ्या, प्रत्येक गोष्ट पडताळून पहा, नंतरच त्याचा अवलंब करा’ अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांनी निसर्गाचे महत्व पटवून देत निसर्गाचा ऱ्हास रोखण्याचे आवाहन त्यांनी केले होते, यापुढच्या काळात पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ येईल, हे दूरदर्शी विचार त्यांनी त्याकाळी मांडले. देशभर फिरुन निसर्गाप्रती संवेदनशील होण्याबरोबरच शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देण्याचे काम केले. समाजाला विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, इहवादी होण्याची शिकवण दिली. त्यांच्या दोहे आणि भजनांनी समाजाला सन्मार्गावर नेण्याचं कार्य केलं. संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर सर्वांनी मार्गक्रमण करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या माजी मंत्र्यांना मोठा धक्का, चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा, सदाभाऊ खोत घटनास्थळी, पोलिसांकडून अडवणूक

News Desk

सत्ता टिकवण्यासाठी डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही

News Desk