HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे असं म्हणून दौरा पुढे ढकलू शकले असते, अजित पवारांचा राज्यपालांना टोला

पुणे | शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी विराट मोर्चा मुंबईत काढला होता. परंतु, राज्यपालांनी भेट न दिल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेट न दिल्यामुळे राज्यपालांवर निशाणा साधला आहे.पुण्यात आज (२६ जानेवारी ( ध्वजारोहण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी शेतकरी मोर्चावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘शेतकरी संघटनांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना २५ तारखेला भेटण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर राजभवनाकडून राज्यपालांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, शेकडो किमी प्रवास करून शेतकरी-कष्टकरी मुंबईत आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा प्रमुख व्यक्तीने आपला पूर्व नियोजित दौरा बदलायचा असं ठरवलं आणि शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचे असं म्हणून दौरा पुढे ढकलू शकले असते, असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अटकेची मागणी’, तर राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ तरुणींचं कौतुक!

News Desk

सुशांतप्रकरणाचे निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली

News Desk

बहुमत विकत घेऊ शकतो, भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला !

News Desk