HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबई’ला कर्नाटकची म्हणणाऱ्या कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी झापलं!

मुंबई | महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा पेटला आहे. यावरुन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक वादग्रस्त विधान केले. ज्यात त्यांनी असं म्हटलं की मुंबई हा कर्नाटकचा भाग आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना झापले आहे. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले होते. असे येडे बरळत असतात अशा शब्दांत त्यांनी सवदी यांना सुनावले होते.

“केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली,” असं सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काय म्हणाले होते?

“महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी म्हटलं होतं.

ही लढाई कशासाठी आहे?, संजय राऊतांचा सवाल

“मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्या आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथं अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा, असं कधी कुणाला म्हणत नाही.” असं संजय राऊत यांनी सीमावादावर बोलताना म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यापूर्वीची वाझेंची हालचाल CCTV त कैद

News Desk

विखे येताच विरोधकांकडून ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’च्या घोषणा

News Desk

शरद पवार गेली ५० वर्षे राजकारणात आहेत मग त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? 

News Desk