HW News Marathi
महाराष्ट्र

नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले?

मुंबई | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा हाती घेतला आहे. तसेच, या ना त्या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर पाळत ठेवण्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवरही त्यांनी टीका केली आहे. पटोलेंच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगितलं जात आहे. नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर पाळत ठेवण्याचा केलेला आरोप हा महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

नाना पटोले यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. तर, नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात नाही. जो नेता असतो त्याच्या माहिती गोळा केली जाते. नाना पटोले यांनी ही माहिती करून घ्यावी. आवश्यकता वाटली तर याबद्दलची माहिती काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री यांच्याकडून घ्यावी त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पटोले यांनी लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

‘ मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा त्यांच्याकडे कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, असा दावाच पटोले यांनी केला आहे. तसंच, ‘राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्त करणार’ असंही पटोले म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी ही दिली प्रतिक्रिया….

News Desk

पंढरपुरात मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवाय केली बकरी ईद साजरी

News Desk

पंकजा मुंडेंच्या टीकेसंबंधी विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले

News Desk