HW News Marathi
महाराष्ट्र

“संभाजीराजेंनी BJP च्या खासदारकीवर लाथ मारायला हवी”, हर्षवर्धन जाधवांचं वादग्रस्त विधान

उस्मानाबाद | मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. सध्या आरक्षण मिळावं म्हणून भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे सध्या दौऱ्यावर असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं होत आहेत. भाजपात राहून खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. छत्रपती संभाजीराजेंनी भाजपाच्या खासदारकीला लाथ मारायला हवी असं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले आहे.

आमदारकीपेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट छत्रपती संभाजीराजेंना आव्हान केलं आहे. खासदारकी-आमदारकीपेक्षा महाराजांची गादी श्रेष्ठ आहे. छत्रपती संभाजीराजेंनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा. आंदोलनाचं नेतृत्व करताना खासदारकी ठेवायची आणि आंदोलन करायचं ही दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही. येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी दिल्लीत धरणं आंदोलन करणार असून संभाजीराजेंनी या आंदोलनात सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेवर छत्रपती संभाजीराजे काय मत मांडतात हे पाहणं गरजेचे आहे.

मला मुख्यमंत्री करा

संवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट राजेंना प्रश्न विचारला, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, अशी मागणी का तुम्ही करत नाहीत. त्यावेळी संभाजीराजे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत असताना, मी ही मागणी करू शकत नाही, आणि असा प्रश्न मला विचारण्यापेक्षा, तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच मागच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना विचारा. तेवढे जमले नाही तर संभाजी राजांना मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यामुळं छत्रपतीची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट झाली का ?असा प्रश्न निर्माण होत आहे.

ओबीसीचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या

संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी समानतेचा विचार मांडला. त्यांचा वारसदार म्हणून मी ओबीसीचे काढून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका घेणार नाही. जे जे वंचित आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी माझी भूमिका कायम राहणार आहे. ते कसे द्यायचे ते सत्ताधाऱ्यांनी ठरवायचे आहे असंही संभाजीराजे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोली दौऱ्यादरम्यान जयंत पाटलांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना

News Desk

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

शिवसेनेचे सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान 

News Desk