HW News Marathi
महाराष्ट्र

“शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, आदित्य यांना जवळ करत उपमुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना टोला

मुंबई | आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत आता सर्वसामान्यांनाही पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत सर्वसामान्यांसाठी हेरिटेज वॉकची सुविधा सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कामांचं कौतुक केलं.

मुंबई महापालिकेत या आधी येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आज आदित्य ठाकरेंमुळे मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि मुंबई महापालिका यांनी पुढाकार घेतल्याने महापालिका मुख्यालयाचं दर्शन हेरिटेज वॉकची संकल्पना राबवली जात आहे. हेरिटेज वॉकल मराठी शब्द शोधला पाहिजे. कारण आपण मराठीचे पुरस्कर्ते आहोत”, असंदेखील ते यावेळी म्हणाले आहेत.

“मुंबई महापालिकेची टोलेजंग आणि ऐतिहासिक इमारत बघणं आणि सव्वाशे वर्षांपूर्वीच्या वास्तुकलेचा अनुभव सर्वसामान्यांना घेता येणार आहे. मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणबाबत ज्या वास्तूत निर्णय घेण्यात आले त्या वास्तूच्या इतिहासाशी समरस होण्याची संधी या निमित्ताने सर्वसामान्यांना मिळणार आहे. मी आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी खरंच एक चांगला विचार केला”, असं अजित पवार म्हणाले.

“पर्यटन मंत्री चांगलं काम करत आहेत. नुकतंच पुण्यात आपण जेल टूरिझमसुद्धा आपण सुरू केलं आहे. पुण्याच्या जेलला एक इतिहास आहे. ही सुरुवात आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.“मुंबईच्या लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या लढवय्यांचे मोठं योगदान आहे. मुंबईच्या माणसात हा सर्व संकट परतून लावण्याची ताकद आहे”, असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

“मुंबई महापालिका ही शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री सेनेचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा एकदम बदलता येणार नाही पण मुंबईच्या रस्त्यावरील टपऱ्या बकालपणे दिसतात. यात बदल झाला पाहिजे”, असं पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी इक्बाल यांना टोला मारल्यानंतर ते काही बोलणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक: यवतमाळमध्ये आश्रमशाळेत शिकणा-या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून हत्या

News Desk

लातूर मनपावर भाजपचा झे्ंडा

News Desk

नांदेड महानगरपालिकेत दोन नगरसेवकांत तुंबळ हाणामारी

News Desk