HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा;शहिदांना अभिवादन 

मुंबई | भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद वीरांना अभिवादन केले आहे.असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया, कोरोनाचे संकट आजवरचे सर्वात मोठे संकट असून पुढचे काही महिने प्रतिबंधक नियमांचे पालन करुन आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीने लढूया, कोरोनाला हरवूया असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले आहे.

स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय सण असूनही कोरोनामुळे तो मर्यादित उपस्थितीत, साधेपणाने साजरा करावा लागत आहे याची खंत सर्वांच्या मनात आहे. असे असले तरी सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारीच्या भावनेतून आपल्याला हे करायचे आहे.कोरोनाचा प्रसार रोखणे, देशवासियांचे प्राण वाचवणे, याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्व देशवासियांनी स्वत:चा, कुटुंबाचा, इतरांचाही कोरोनापासून बचाव करुन कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान द्यावे ही आजच्या घडीची सर्वात मोठी देशसेवा आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना कोरोनामुक्तीच्या लढ्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणे ही आपली जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आजवर अनेक सुपुत्रांनी सर्वोच्च त्याग केला. अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, अंगणवाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचे, राज्यभरातील लोकप्रतिनिधींचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.

राज्यातील जनतेनेही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नियम व संयम पाळून मोठा त्याग केला आहे. सक्रीय योगदान दिले आहे. आपले योगदान महाराष्ट्र विसरणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेलाही धन्यवाद दिले आहेत.देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk

बॉलिवूड अभिनेत्री ते राजकारण, उर्मिला मातोंडकर यांचा प्रवास…

News Desk