HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी घेतली रस्ते कंत्राटदारांची शाळा, सहनशीलतेचा अंत पाहू नका…

पुणे। पुण्यातील काम लवकर वेळेत पुर्ण करा, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा सज्जड दम उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कंत्राटदारांना दिला आहे. अजित पवार नेहमी अधिकाऱ्यांवर कामांच्या गतीवरुन बोलत असतात. पुण्यात अनेक कामे सुरु असून ही कामे लवकरात लवकर कशी पुर्ण करता येतील यावर कंत्राटदार आणि महानगरपालिकेने भर दिला पाहिजे. अजित पवारांनी यापुर्वीही कामकाजासंदर्भात अधिकारी आणि कंत्राटदारांना खडेबोल सुनावले आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजनावेळी अजित पवारांनी कंत्राटदार आणि महानगरपालिकेवर निशाणा साधत जलद कामे करण्याचा सल्ला दिला आहे.

अशी कामे वेळेत पुर्ण होणं अतिशय गरजेचे आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार सिंहगड रोडवर उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी कामे जलदगतीने करण्यासाठी कंत्राटदारांना दम दिला आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, कंत्राटदारांना सांगू इच्छितो की पुण्यात अनेक विकासकामांची कामे सुरु आहेत. रस्त्यांची कामे, उड्डाणपुलांची कामे, मेट्रोची कामे सुरु आहेत. अशी कामे वेळेत पुर्ण होणं अतिशय गरजेचे आहे. नितीन गडकरी नेहमीच त्यांच्या भाषणात बोलत असतात त्यांच्या कामाची गतीही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पुण्यातील लोकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हे काम पुर्ण कसे करता येईल याकरता संबंधिक कंत्राटदार आणि महानगरपालिकेने लक्ष द्यावे. सरकारी कामात काही अडथळा आल्यास मी पुढाकार घेऊन ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करेल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सर्वात चांगलं शहर करण्याची जबाबदारी असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं

नितीन गडकरींनी म्हणाले की, वेळेच्या १५ मिनिटांपुर्वी ये, प्रकल्पात काही वेगळ करण्याचा विचार आहे. राज्य सरकार , पुणे पालिका आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने आपण काम साधून घेऊ आणि राजकारणाच्या वेळी राजकारण करुच असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील काही महत्त्वाच्या मार्गांना वेगळ्या वेगळ्या रस्त्यांना जोडण्याबाबत तसेच रस्त्यांसाठी जमिन अधिग्रहण पूर्ण होत आहे. त्याचेही भूमिपूजन घ्यायचे आहे. यामुळे राज्यमंत्रीमंडळाची बैठक घेऊन चर्चा करण्यात यावी. पुण्यात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कितीही रस्ते काढले तरी कमी पडतील यामुळे पुण्याला जगातलं सर्वात चांगलं शहर करण्याची जबाबदारी असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सकाळी टीका,दुपारी OBC अध्यादेशावर सही, 12 तासांत दुसऱ्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांचे आभार!

News Desk

“असाच बदल बिहारच्या निवडणुकीतही दिसेल”, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

News Desk

मी कधी ठाकरेंचा फॅन नव्हतो, मात्र मुख्यमंत्र्यांचे आत्ताचे कार्य ह्रदयाला भिडणारे आहे – प्रशांत भूषण

News Desk