HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सत्तापेचादरम्यान राज्यपालांच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

मुंबई | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी महिनाभर सत्ता संघर्ष सुरू होता. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या मुदतीपासून ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ देण्यापर्यंत राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप अनेक नेत्यांनी केला. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया प्रॉफेशनल काँग्रेस महाराष्ट्रचे सेक्रटरी मॅथ्यू एंटोनी यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पत्र त्यांना पाठविले आहे.

मॅथ्यू एंटोनी यांच्याशी एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कने संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाल्यानंतर राज्यपालांनी बजावलेली भूमिका ही संशयास्पद होती. मग ती राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणे, भाजपला सत्ता स्थापनेसाठी दिलेली मुदत यावरून राज्यपालांची भूमिका भाजपला पोषक असे निर्णय दिले.”

पुढे एंटोनींनी यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, “सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांडून देण्यात आलेल्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रची कोणत्याही प्रकारची शहानिशा केली गेली नाही. आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली, या सर्व प्रकरणावर राज्यपालांची भूमिकाही वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे एंटोनी यांनी एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.”

राज्यात सत्तास्थापनेच्या अशा घडल्या राजकीय घडमोडी

निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपला दोन दिवस दिले तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येक एक दिवस देण्यात आला होता. यावरून दोन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यपालांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. या दोन्ही पक्षांना बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे राज्यात १२ नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्ता स्थापनेसाठी चर्चा होऊ लागल्या. अखेर तिन्ही पक्षांनी एकत्र चर्चा करून महाविकासआघाडी रुपाने राज्यात आणि देशात नवे समीकरण पहायला मिळाले. महाविकासआघाडीकडून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता.

त्याच रात्री भाजपने राज्यापालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आणि त्यानंतर राज्यपालांनी शनिवारी (२३ नोव्हेंबर)च्या पहाटे राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणली. यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. या राजकीय प्रकरणानंतर राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले होते. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांनी ५४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र दिले होते. मात्र, राज्यपालांनी अजित पवारांनी दिलेल्या पत्राची खातरजमा न करता त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ कशी दिली ?, असा प्रश्न उपस्थित करून राज्यपालांनी संविधानाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप ऑल इंडिया प्रॉफेशनल काँग्रेस महाराष्ट्रच्या पत्रात केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यपालांना राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरली, चंद्रकांत पाटील म्हणतात….

News Desk

नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा! : नाना पटोले

News Desk

‘अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेलच’- संजय राऊत

News Desk