HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादच्या कचराकोंडीला राज्यसरकारही जबाबदार | उद्धव ठाकरे  

औरंगाबाद |कच-याच्या ढिगा-यात गेल्या दोन महिन्यांपासून दिवस ढकलत असलेल्या औरंगाबाद करांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौ-यावर आहेत. गुरुवारी त्यांनी औरंगाबादला भेट दिली यावेळी आवर्जून उद्धव यांनी सामान्यांना त्रासदायक ठरत असलेल्या औरंगाबादच्या कचरा प्रश्नाला हात घातला.

या कच-याची विल्हेवाट करण्याची जबाबदारी नक्की कुणाची आहे या वादात मी पडणार नाही असे म्हणत आपण या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

गुरुवारी त्यांनी औरंगाबादेतील कंचराकोंडीवर दिलगिरी व्यक्त केली. मात्र या कचराकोंडीला एकटी शिवसेना नव्हे तर राज्य सरकारही जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाही टोला लगावला. दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न मार्ग लागला नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या होणार निवडणूक

News Desk

“जर पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर…”, तुषार भोसलेंचा अजितदादांना इशारा

News Desk

“तर तो ‘शक्ती’ कायदा, काय चाटायचा आम्ही?”, पूजा आत्महत्या प्रकरणावरुन राणे बंधुनी सरकारला झापले

News Desk