HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील सीमा बंद करण्याचा सरकार निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांच्याकडून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. दरम्यान, हा कर्फ्यू आज रात्री ९ वाजेपर्यंत होता पण आता तो उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ मार्च) पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्याच्या सीमाही बंद करण्याच्या विचारात ठाकरे सरकार आहे अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, लोकल सेवा या सामान्य नागरिकांसाठीदेखील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. जर, गरज पडली तर हा काळ वाढवावा लागेल असेही मुख्यंमंत्र्यांनी सांगितले.

संकट गंभीर असले तरीही सरकार खंभीर आहे, असा धीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे. राज्यात आज (२२ मार्च) मध्य रात्रीपासून नाईलाजाने १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी केली. या काळात ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कालपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के होती. ती आज कमी करत ५ टक्के सरकारी कर्मचारी काम

राज्यातील रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत. राज्यात फक्त आणि फक्त शहरी भागातील बस सेवा सुरू असणार आहे. ही बस सेवा, जीवनावश्यक वस्तूची न आण, जीनावश्यक सेवांसाठी नेआण करण्यासाठी ही सेवा सुरू असणार आहे. अवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

भाजी पाला, वीज पुरवठा करणआर कार्यलय, बँक आणि त्यांच्या संबधित, आर्थिक व्यवहार चालणार केंद्र सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पूर्व ५० टक्के, काल २५ टक्के केली होती. मात्र आता राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्क्यावर आली आहे. त्यामुळे त्यांच्याव जास्त ताण येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ – धनंजय मुंडे

News Desk

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे,येर गबाळ्याचे काय काम !!अभंगाचा संदर्भ देत फडणवीसांचा सरकारला टोला

News Desk

जलयुक्त शिवारमधील भ्रष्टाचार भोवला, रमेश भतानेंसह ६ जणांविरुद्ध परळी पोलिसांत गुन्हा दाखल‌

News Desk