HW News Marathi
महाराष्ट्र

हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार, फडणवीसांचा सरकारला सवाल

मुंबई | सध्या देशात सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात येस बॅंक आणि एचडीआयएल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपिल आणि धीरज वाधवान आपल्या कुटुंबासमवेत महाबळेश्वरला खास परवानगीचे पत्र घेऊन गेले होते. आणि त्यांना पत्र देणाऱ्या गृह विभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवरही पाठवले होते. आणि त्यांना आता रुजूही करुन घेतले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महालिकास आघाडी सरकारला वाधवान प्रकरणी काही प्रश्न विचारले आहेत.

“लॉकडाउनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधू यांना फिरण्यास पास दिलेले अधिकारी अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आले आहे. मी त्यावेळीही सांगितले होते अशा प्रकारचा कोणाताही पास कोणताही अधिकारी आपल्या भरवशावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधील प्रमुख लोके आदेश किंवा आशीर्वाद देत नाहीत तोवर असा पास त्यांना देता येत नाही.

“आता ज्या गतीने त्यांना क्लिनचीट देण्यात आली आणि त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले यातून सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्या प्रमुखांच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना पास देण्यात आला होता हे स्पष्ट होत आहे,” असा आरोपही यावेळी फडणवीसांनी केला आहे. तसेच, हे आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार आहे असा सवाल करत या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीयाच्या माध्यमातून केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna

करुणा शर्माच्या गाडीत ठेवलेल्या पिस्तुलाबद्ल भाजप नेते काय म्हणाले?

News Desk

कसब्यात ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांचा विजय; 28 वर्षानंतर ‘भाजप’चा पराभव

Aprna