HW News Marathi
देश / विदेश

अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! अमित शाहांचा ठाकरे सरकार निशाणा

मुंबई । मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना आज (४ नोव्हेंबर) ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे भाजपमधील वातावरण तापलं असून खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.अमित शाह यांनी ट्विट करत या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा”, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईबाबत निषेध व्यक्त करताना अमित शाह म्हणतात की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. सत्तेचा दुरूपयोग करून रिपब्लिक टिव्ही आणि अर्णब गोस्वामीला केलेली अटक हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे.

सध्याची परिस्थिती ही आणीबाणीसारखी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने महाराष्ट्राचा गौरव केला त्याला आज १० वर्ष पूर्ण !

News Desk

आम्हाला विश्वासात न घेता शासन निर्णय काढला ! राज्य सरकारवर काँग्रेस प्रचंड नाराज

News Desk

पाकिस्तान सरकारकडून १८२ मदरशांवर नियंत्रण

News Desk