HW News Marathi
महाराष्ट्र

राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अमोल कोल्हे म्हणाले, अभिमान तर असेल, पण…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ जुलैला वाढदिवस झाला. उद्धव ठाकरे हे देशाचं नेतृत्व करतील असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला अभिमान असेल पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असं अमोल कोल्हे म्हणाले आहे.

आम्हाला अभिमान असेल पण….

अमोल कोल्हे यांनी संजय राऊतच्या वक्तव्यावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. त्यात ते म्हणाले, संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल. ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे. संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला आहे त्या बद्दल त्यांना शुभेच्छा… मात्र पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असंही ते म्हणाले या आहेत.

राऊत काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो , असं प्रत्येकाला वाटतं . हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी , प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे . ते देशाला नेतृत्व देतील , अशा शुभेच्छा मी त्यांना देतो , असं राऊत म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण

News Desk

“हा पुरावा किरीट सोमय्याला नाक घासायला लावणार”, अनिल परबांचा इशारा

Aprna

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली मंत्रिपदाची मागणी… सुप्रिया सुळे अजित पवारांशी बोलणार !

News Desk