HW News Marathi
महाराष्ट्र

योगी सरकारने कोणाच्यातरी आडून राजकारण करणे थांबवावे, अमोल कोल्हेंची हाथरस प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया

जुन्नर | उत्तर प्रदेशामधील हाथरस येथे झालेल्या बलात्काराचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही या प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे.

न्यूज १८ लोकमतशी बोलताना त्यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे. ‘ ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा जेवढा निषेध करावा, तेवढा थोडा आहे’ असे म्हणत निषेध केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे योगी सरकारने कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून आणि ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तेथील माता भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचं राहिल, असा सल्लावजा टोलाही अमोल कोल्हे यांनी योगी सरकारला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझगावमधील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमनदल घटनास्थळी दाखल

swarit

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

Aprna

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी तेलतुंबडेंना अटक

News Desk