HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जी वसुली केली त्याची परमबीर सिंग यांनी कबुली द्यावी, राष्ट्रवादीची मागणी  

मुंबई | मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंगयांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत हे सगळे आरोप खोटा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, भाजपकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून या सगळ्या प्रकरणावर आता हळूहळू प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘मागच्या काळात माजी गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जी वसुली केली जायची याबाबत परमबीर सिंग यांनी प्रामाणिकपणे कबुली द्यावी. तरच ते प्रामाणिकआहेत हे सिद्ध होईल.अन्यथा अचानक झालेला साक्षात्कार दिल्लीश्वराच्या आदेशावरून आहे यात कुणाला शंका नसेल. पोलीस आयुक्त परमबीर सिंग अचानक गृहमंत्र्यांवर जे खोटे आरोप करायला लागलेत यावरून भाजपने केंद्रीय यंत्रणेचा यावेळीही गैरवापर करून दडपशाही मार्गाने सिंगाना पत्रव्यवहार करायला भाग पाडलं आहे. भाजपा सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकते हे महाराष्ट्राला माहित आहे. सावधान’, असं म्हणत अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षामध्ये कोणताही गट नाही- खासदार प्रतापराव जाधव

News Desk

परमबीर सिंगांविरोधात आणखी एक तक्रार, उच्च नायायालयात मध्यरात्रीपर्यंत सुनावणी

News Desk

मेट्रो कारशेड प्रकल्पा विषयी मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करतायत, किरीट सोमय्या यांचा आरोप

News Desk