HW News Marathi
महाराष्ट्र

त्रिपुरा हिंसाचारांचं अमरावतीत तीव्र पडसाद; बंदला हिंसक वळण, तणावाचं वातावरण

मुंबई | त्रिपुरा हिंसाचाराचं तीव्र पडसाद राज्यात पडले आहेत. अमरावतीत काल (१२ नोव्हेंबर) त्रिपुरा अत्याचार आणि प्रार्थनास्थळांच्या नासधूस घटनंच्या निषेदार्थ काढलेल्या रॅलीत पोलिसांवर दगडफेक झाली होती. या पार्श्वभूमीवर अमरावतीत बंद आज (१३ नोव्हेंबर) पुकारला होता. मात्र, अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण आले. अमरावतीत आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं अमरावतीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अमरावतीतील रामकमल चौकात मोठ्या संख्येनं जमाव झाला असून आज अमरावतीत मोठ्या संख्यंनं शेकडो तरुणांनी तोंडावर रुमाल बांधून रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली आहे. यात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत जमावांनं तोडफोड केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमके काय आहे प्रकरण

त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली काल ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रात शरद पवारांवर टीका केल्याशिवाय कोणी मोठा होत नाही !

News Desk

महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; राजू शेट्टी बाहेर पडण्याचं कारण नव्हते! – जयंत पाटील

Aprna

“सोमय्याजी, मी आधीच पोहोचलोय…तुमचंही स्वागत”; नांदेडमध्ये काँग्रेसकडून भाजपला थेट आव्हान?

News Desk