HW News Marathi
महाराष्ट्र

जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत अमरावतीत प्रचंड दगडफेक!

अमरावती। त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पडसाद उमटत आहेत. मात्र दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला ताण तणावाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील अमरावतीला याचा सामना करावा लागतोय. भाजपने अमरावती बंदची हाक दिलेली असतानाच आज शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली. अनेकजण तोंडाला रुमाल बांधून आले होते. तर काहींच्या हातात काठ्या होत्या. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत या तरुणांनी तोडफोड केल्याने संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.

अमरावतीत भीतीच वातावरण

त्रिपुरातील घटनेच्या काल मुस्लिम समुदायांनी अमरावतीत आंदोलन केलं होतं. मुस्लिमांनी दगडफेक केल्याने अमरावतीत भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध म्हणून आज अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, राजकमल चौक आणि गांधी चौकात अचानक शकेडो तरुण जमले. तोंडाला रुमाल आणि हातात काठ्या घेऊन आलेल्या या तरुणांनी संपूर्ण परिसरात जोरदार दगडफेक केली. या जमावाने दुकानांचीही तोडफोड करत जबरदस्तीने दुकाने बंद केली.

पोलिसांची दमछाक

आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फिरकावल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काहींनी मात्र थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलिसांची यात मोठी तारांबळ उडाली.

पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे

मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.तसंच, राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सीमा बंद करण्याचा सरकार निर्णय घेण्याची शक्यता

swarit

‘करुणा शर्मा यांच्या निवासस्थानी बीड पोलीस दाखल’, तर सर्च ऑपरेशन सुरू!

News Desk

भाजप मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी खेळतेय, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

News Desk