HW News Marathi
महाराष्ट्र

26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पथकाला एकनाथ शिंदेकडून 51 लाखांचं बक्षीस!

गडचिरोली। गडचिरोली जिल्ह्यात जंगलात 26 नक्षलवाद्यांना नुकतंच कंठस्नान घालण्याची मोठी कामगिरी पोलिसांच्या सी 60 कमांडो पथकाने कौतुकास्पद कामगिरी पार पाडली. या कामगिरीसाठी जिल्हा नियोजन फंडातून आता 51 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याचा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच, निर्देश जिल्हाधिकारी संजय मीणा यांना दिले आहे.नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने आता सगळीकडे या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.

विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी 60 पथकाने अतुलनीय शौर्य दाखवून 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत 4 पोलीस जवान देखील जखमी झाले होते. पालकमंत्री शिंदे यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन या जवानांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे जाऊन सी 60 पथकातील पोलिसांची देखील भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख बदलून टाकू

पोलिसांची काम करण्याची जिद्द, त्यांच्या कार्याचा गौरव, आणि त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांचे अभिनंदन करण्यासोबतच त्यांना हे विशेष बक्षीस देत असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नक्षल पीडित बांधवांसाठी विशेष तरतूद करून उपाययोजना करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल आहे. या जिल्ह्याची एक मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा ही ओळख बदलून टाकून इथल्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यापुढेही शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात !

News Desk

संभाजी भिडे यांच्या विरोधात एकही पुरावा नाही

News Desk

ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा! – नाना पटोले

News Desk