HW News Marathi
महाराष्ट्र

नैराश्यातून अमृता फडणवीसांनी ‘ते’ वादग्रस्त ट्वीट केल्याचं मनिषा कायंदेंचा टीका

मुंबई | राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आल्या आहेत. या ट्वीटमधून अमृता फडणवीसांनी महाविकासआघाडीतील नेत्यांनावर टिप्पणी केली आहे. फडणवीसांच्या ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमृता फडणवीस यांच्या वादग्रस्त ट्वीटवर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी देखील टीका केली आहे. 

अमृता फडणवीस म्हणाले, “”थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है _नामर्द है !” फडणवीसांनी ट्वीटमधून शिवसेनेचे खासदार संजय राूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला आहे. 

यानंतर मनिषा कायंदे म्हटल्या, “फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्यांनी असे ट्वीट केले आहे.  त्यांचे हे ट्वीट नैराश्यातून त्यांनी ही टीका केली असावी.”अमृता फडणवीसांच्या ट्वीटसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, “अमृता फडणवीस आमच्या सुनबाई आहेत. त्यांच्याविषयी काही बोलणार नाही, असे ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात मधील भक्ताने अर्पण केला शनीचरणी १९ लाखांचा कलश

News Desk

“एकमेकांच्या मुळावर येणार असाल तर ते सहन होणार नाही, संजय राऊतांचा इशारा

News Desk

पीक विम्याच्या बीड पॅटर्नला केंद्राचा रेड सिग्नल, रब्बी हंगामासाठी तरी परवानगी द्यावी, दादा भुसेंची मागणी

News Desk